उद्योजक कसे बनावे?www.marathimahiti.com

उद्योजक कसे बनावे?

उद्योजक बनायचे असेल तर 'बनिया बुद्धी' हवी. बनिया बुद्धी म्हणजे उद्योग क्षेत्रात अग्रक्रमावर असलेल्यांचे व्यावसायिक शहाणपण. 'बनियां'चे पुस्तकी शिक्षण फार नसते; परंतु त्यांनी व्यवसायाचे धडे रस्त्यावर उतरून घेतलेले असतात. जोखीम घेण्याचे बाळकडू त्यांनी लहानपणी घेतलेले असते.

उद्योजक बनायचंय? हे १० गुण आत्मसात केले तर यशाचं शिखर नक्की गाठू शकाल :

१. योग्य वेळ
तुमच्या डोक्यात एखादी कल्पना आली असेल, तुम्ही ती सगळ्यांसमोर मांडली पण आहेत, पण तुम्ही सगळ्यांना सांगत आहात की तुम्ही योग्य वेळेची वाट पाहात आहात तर तसं करू नका.
अशी वाट पाहून ‘योग्य वेळ’ कधीच येणार नाही. त्यासाठी तुम्ही डोक्यात कल्पना आली की तीच योग्य वेळ समजा आणि कामाला लागा, नाहीतर वाट बघण्यातच आयुष्य संपून जाईल.

२. ग्राहक खूश होतील याची काळजी घ्या.
कोणत्याही धंद्यात सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला आहे तर ग्राहकाला. ‘ग्राहक देवो भव।’ असं म्हणतात ते उगीच नाही. ग्राहकाला जर तुम्ही खूश ठेवू शकलात तर तुमचा व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल.
सुरुवातीला तुम्हाला फारसा नफा मिळणार नाही, पण एकदा का ग्राहकाचा तुमच्यावर विश्‍वास बसला तर तो दुसरीकडे जाणार नाही हे नक्की.

३. नवीन शोध
तुम्ही सर्वसामान्य व्यावसायिक असाल तर तुम्ही आहेत त्यातच समाधानी असता, मिळालेल्या यशाचेच गोडवे गाता, त्याचा विजय साजरा करता, पण जर मोठा उद्योजक व्हायचं असेल तर सतत काहीतरी नवीन शोध घेतला पाहिजे नवीन आव्हाने घ्यायला तयार राहिले पाहिजे
हेच यशस्वी उद्योजकाचे कौशल्य आहे.

४. जर तुम्ही तुमच्या बॉसपेक्षा जास्त काम करत असाल
जर तुम्ही नोकरीवर आहात आणि तुमच्या बॉसपेक्षा जास्त काम करत आहात तर तुम्ही स्वत:चा व्यवसाय काढायला पूर्णपणे योग्य आहात. स्वामित्व ही तुमची मानसिकता यातून दिसते.
तुम्ही कुणाच्या अंमलाखाली काम करत नाही तर तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी काम करत आहात हे यातून दिसून येते आणि तेच उद्योजक म्हणून आवश्यक आहे. तेव्हा आता स्वत:च्या व्यवसायाचा विचार करायला हरकत नाही.

 

५. साईडबिझनेसच वाढवा
जर तुम्ही नोकरी करत आहात आणि तरीही स्वत:चा छोटासा व्यवसाय पण वेळ मिळेल तसा करत आहात. व्यवसाय चांगला चालत आहे, पण तुम्हाला त्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाहीये तर वाट कशाची बघताय?
 

६. आता पुढे जाण्यासाठी काही शिल्लक नाही.
जर तुम्ही करत असलेल्या नोकरीत सर्वश्रेष्ठ पदावर आहात आणि आता तुम्हाला वाटत आहे की शिकण्यासाठी आता काही शिल्लक नाही. तुम्ही सर्व जबाबदार्‍या योग्य रितीने पार पाडत आहात तर तुम्ही नवीन पुढील आव्हानासाठी तयार व्हा.
नाहीतर तुमची कुचंबणा होईल आणि वर्षानुवर्षे तेच काम करत राहाल आणि तुमच्या हुशारीचा काही उपयोग होणार नाही. तसेच आर्थिक परिस्थितीही आहे तशीच राहील.

७. तुम्ही टीव्ही पाहू शकता किंवा इतर करमणुकीच्या साधनात पण वेळ घालवू शकता, पण ते करण्याऐवजी जर तुम्ही तुमच्या व्यवसायातील भांडवल किंवा व्यवसाय कसा वाढवायचे याचा जर विचार केलात.
असा विचार करत असाल की, ‘मी माझ्या कल्पना पैसे मिळवण्यासाठी वापरल्या तर?’ असा विचार तुमच्या मनात आला की ओळखा की हेच साईन आहे तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकाल. आता तुम्हाला व्यवसायात उडी घ्यायला हरकत नाही.

 

८. जर असं झालं तर
तुम्ही जर असा विचार सतत करत असाल की, ‘जर असं झालं तर काय होईल?’ तर नक्कीच तुम्ही तुमच्या अंतर्मनाप्रमाणे विचार करा आणि तसं करा.
असा विचार तुम्ही करता म्हणजे नक्कीच काहीतरी उद्देश तुमच्या मनात आहे आणि तुम्ही तो साध्य करू शकता. तेव्हा पुढे जा.
अंतर्मनातील सुप्त इच्छा तुम्हाला यशस्वी बनवण्यास नक्कीच मदत करेल.

 
९. सर्वांपेक्षा वरचढ
जर सर्व मित्र, नातेवाईकांत तुम्ही विचारात पुढे असाल आणि तुम्हाला जाणवत असेल की आपल्यात काही तरी वेगळं नक्की आहे. आपण सगळ्यांच्यात वेगळे आहोत तर नक्की यावर विचार करा आणि वेगळेपण सिद्ध करा.
त्यासाठी एखादा उद्योग सुरू करा तुमच्या हुशारीचा फायदा नक्की होईल आणि तुम्ही अजून वरचढ व्हाल.

१०. अंतिम
कोणताही उद्योजक असला तरी त्याच्या मनात भीती नाही असं होऊच शकत नाही. आपल्याला जर भीती, संशय वाटत असेल तर ते स्वाभाविकच आहे.

आपण आपल्या समाजात, कुटुंबातून किंवा असुरक्षिततेच्या भावनेतून घाबरत असतो, पण हे भय असत्य आहे याची जाणीव असणे आवश्यक आहे. भय वाटू नये यासाठी आत्मविश्‍वास वाढवा आणि तुम्ही तुमच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा. जसं तुम्हाला पाहिजे तसं जीवन जगा.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:26 ( 3 years ago) 5 Answer 4683 +22