Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
ग्रामीण कथाकार कोण आहे?
रा. रं. बोराडे यांनी जरी विविध वाङ्मयप्रकार लीलया हाताळले असले तरी, त्यांची खरी ओळख ग्रामीण कथाकार अशीच आहे. बोराडे यांनी आपल्या कथांमधून खेड्यापाड्यांतील बहुजन समाजातील शेतकरी-शेतमजुरांचे जगणे, त्यांचे नातेसंबंध, या नातेसंबंधांतून निर्माण झालेले भावबंध, ताणतणाव, त्यांचे दैन्य, दारिद्र्य, दुःख इ
बोराडे यांनी आपल्या कथांमधून खेड्यापाड्यांतील बहुजन समाजातील शेतकरी-शेतमजुरांचे जगणे, त्यांचे नातेसंबंध, या नातेसंबंधांतून निर्माण झालेले भावबंध, ताणतणाव, त्यांचे दैन्य, दारिद्र्य, दुःख इ.चे चित्रण केले आहे. आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेतून मानवी जीवनात निर्माण होणाऱ्या दुःखांना अटळ सनातन दुःखाचे रूप देऊन बोराडे त्याला कथेत बांधतात. बोराडे कधीही असामान्य माणसांच्या कथा लिहीत नाहीत, तर अतिसामान्य माणसांच्या कथा लिहितात. ‘नातीगोती’ हा बोराडे यांच्या चिंतनाचा, ध्यासाचा तसेच आवडीचा अनुभवविषय म्हणून लक्षात घेण्यासारखा आहे. नात्यांच्या संबंधांचे भावनात्मक रूप आणि त्यातील ताणतणावांमधून बोराडे यांची कथा साकारत जाते. बोराडे यांनी ग्रामीण मनाची जाण ठेवून मराठवाड्याच्या समाजजीवनाचे अस्सल चित्रण केले आहे. कष्टकरी माणसांच्या जीवनजाणिवा असीम सहानुभूतीने मांडत असतानाच त्यांनी अशा माणसांचे अज्ञान, विसंगती, अशिक्षितपणा, पारंपरिकता यातून स्थलकालपरत्वे विनोदनिर्मितीही केली आहे. बोराडे यांनी आपल्या अनुभवविश्वाच्या सामर्थ्यावर विपुल कथानिर्मिती करून ग्रामीण मराठी कथेचे दालन समृद्ध केले आहे. मराठवाड्याच्या बोलीचा वापर केल्यामुळे आणि संवादातील रसरशीतपणामुळे बोराडे यांची कथा जिवंत वाटते. ग्रामीण वाक्प्रचार व म्हणींचा पुरेपूर वापर करून बोराडे यांनी कथेला आशयसंपन्नता प्रदान केली आहे. बोराडे यांनी मराठवाड्यातील ग्रामीण जीवनाचे प्रत्ययकारी व वास्तवदर्शी चित्रण मराठवाड्याच्या बोलीभाषेतच केले आहे.
ग्रामीण जीवनातील बहुविध अनुभव, त्यातील दारिद्र्य, अज्ञान, हेवेदावे, संकेत, परिस्थितीशरणता, लाचारी, माणसांचे विविध मनोव्यापार टिपत असतानाच बोराडे यांनी ग्रामीण माणूस हुबेहूब उभा केला आहे. उत्कट जीवनेच्छा आणि परंपरागत दारिद्र्य यातून ही पात्रे जगण्याचा प्रयत्न करत राहतात. अशा पात्रांच्या माध्यमातून व्यक्तिदर्शन आणि जीवनदर्शन यातील एकरूपतेने मनोज्ञ दर्शन ही कथा घडविते. ग्रामीण वास्तवाला समर्थपणे सामोरी जाणारी बोराडे यांची कथा ही माती आणि माणसाचे नाते अधोरेखित करणारी प्रयोगशील कथा आहे. या कथेतून ‘मराठवाडा’ या एकेकाळच्या निजामी राजवटीतील प्रदेशाची सांस्कृतिक जाण व्यक्त होते. रा. रं. बोराडे यांनी प्रथमच ‘मराठवाडा’ हा प्रदेश मराठी साहित्याच्या नकाशावर अतिशय ठळकपणे आणला. बोराडे यांच्या कथेने वर्तमान ग्रामीण जीवनातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक समूहमनाचे अंतरंगही बोराडे यांची विकसनशील कथा उलगडून दाखविते. वेगवेगळ्या कारणांमुळे होणारी ग्रामीण माणसाची घुसमट हे बोराडे यांच्या कथा-कादंबरी लेखनाचे प्रधान आशयसूत्र आहे. कौटुंबिक, सामाजिक आणि अलीकडच्या काळात आर्थिक अशा विविध स्तरांवर हे आशयसूत्र त्यांनी अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. एकाचवेळी ग्रामीण जीवनातील कारुण्य हुडकणाऱ्या आणि विसंगतीचा शोध घेणाऱ्या बोराडे यांच्या कथेने ग्रामीण मराठी कथेत स्वतःचे स्वतंत्र असे स्थान निर्माण केले आहे. गंभीर प्रकृतीच्या कथांबरोबरच बोराडे यांनी विनोदी कथादेखील लिहिल्या आहेत. त्यांच्या विनोदी कथा ‘ताळमेळ’, ‘फजीतगाडा’, ‘खोळंबा’, ‘हेलकावे’ इ. संग्रहात समाविष्ट आहेत. बोराडे यांनी मराठवाड्याच्या मातीत जन्मलेला निर्विष विनोद आपल्या कथेत आणला. हा विनोद सकस, निर्भेळ, वास्तव आणि प्रांजळ असल्यामुळे बोराडे यांच्या विनोदी कथांना वाचकमान्यता मिळाली आहे.
१९७०च्या सुमारास बोराडे यांची ‘पाचोळा’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने त्यांना भरभरून यश मिळवून तर दिलेच, शिवाय कादंबरीकार म्हणून नावही मिळवून दिले. बोराडे यांनी ‘पाचोळा’मध्ये ठसठशीत व्यक्तिचित्रण, प्रत्ययकारी समाजदर्शन आणि ग्रामीण लोकांच्या मानसिकतेचे मनोहारी दर्शन घडविले आहे. मराठी साहित्यविश्वात उद्धव शेळके यांची ‘धग’ आणि रा. रं. बोराडे यांची ‘पाचोळा’ या दोन कादंबऱ्यांची नेहमी तुलना केली जाते. शहरीकरणामुळे उद्ध्वस्त होत चाललेले पारंपरिक व्यवसाय आणि त्यावर गुजराण करणाऱ्या कारागिरांच्या कुटुंबाची होत असलेली वाताहत ही ‘पाचोळा’ कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. कादंबरीची नायिका पारबती हिच्या प्रथमपुरुषी निवेदनातून ही कादंबरी गतिमान झाली आहे. नवरा गंगाराम याचा हट्टीपणा आणि या गुणाच्या बाबतीत बापाचा वारसा चालविणारा मुलगा भाना यांच्या द्वंद्वात सापडलेली गंगारामची पत्नी पारबती हिच्या आयुष्याचा कसा ‘पाचोळा’ झाला, ते या कथानकातून प्रकर्षाने जाणवते. ‘पाचोळा’ ही जशी शोषित पारबतीची कथा आहे तशी ती तापट, स्वाभिमानी आणि जिद्दी स्वभावाच्या गंगारामचीही कथा आहे. परिस्थितीला शरण न जाता गरडासारख्या सरंजामीवृत्तीच्या शक्तीच्या विरोधात सर्व शक्तीनिशी संघर्ष करतो आणि या संघर्षात गंगाराम आपला विनाश ओढवून घेतो. ‘पाचोळा’ ही एका कारागिराची शोकांतिका आहे. मानवी जीवनातील शोक ही बोराडे यांच्या लेखनामागची प्रवृत्ती आहे. ‘पाचोळा’त स्त्रीजीवनाचे दुःख मोठ्या जोरकसपणे व्यक्त झाले आहे. बोराडे यांनी आत्मप्रतिष्ठेसाठी अस्तित्व पणाला लावणाऱ्या गंगारामाचे जे चित्रण प्रत्ययकारीपणे ‘पाचोळा’त उभे केले आहे, तसे ते अन्यत्र अभावानेच आले असेल.
‘शाळेला चाललो आम्ही’ ही किशोर कादंबरी लिहून बोराडे यांनी बालकुमार साहित्यातही योगदान दिले आहे. ‘ग्रामीण साहित्य: चळवळ आणि निर्मिती’ या समीक्षालेखसंग्रहाच्या माध्यमातून बोराडे यांनी ग्रामीण साहित्य चळवळीची मांडणी केली आहे. बोराडे यांच्या अलीकडच्या लेखनावर शेतकरी संघटनेच्या चळवळीचा प्रभाव जाणवतो. ‘कणसं आणि कडबा’ या कथासंग्रहात आणि ‘चारापाणी’ या कादंबरीत हा प्रभाव अधिक गडद होताना दिसतो. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी वेळोवेळी व्यक्त केलेल्या विचारांमुळे आपल्याला शेतकरी-शेतमजुरांच्या जगण्याकडे बघण्याची नवी दृष्टी आली, नवी जाणीव मिळाली, असे बोराडे स्वतःच नोंदवितात.
बोराडे यांच्या एकंदरीत सर्वच लेखनातून ग्रामजीवनाच्या बदलत्या प्रश्नांची आणि स्थितीगतीची नीट ओळख होते. ग्रामीण स्थित्यंतराचा कलात्मक दस्तऐवज म्हणूनही बोराडे यांच्या साहित्याकडे पाहता येऊ शकेल. बोराडे यांनी मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकरी कुटुंबांच्या जीवनाचे तलस्पर्शी चित्रण आपल्या कथाकादंबऱ्यांतून केले आहे. त्यातून या प्रदेशातील रीतीरिवाज, समजुती, सण-समारंभ, वैवाहिक जीवन, स्त्री-पुरुष संबंध, केवळ जगण्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा यांचे हुबेहूब दर्शन घडते. दमनयंत्रणेची शिकार झालेली स्त्रीपात्रे हा बोराडे यांच्या लेखनाचा ठळक विशेष होय.