1969 साली किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?www.marathimahiti.com

१९ जुलै १९६९ रोजी राष्ट्रपतींच्या वटहुकूमाद्वारे ५० कोटी रु. पेक्षा अधिक ठेवी असणा-या १४ मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. बँक व्यावसायिकांना या वटहुकूमाला न्यायालयात आव्हान देवून तो घटना बाह्य ठरविला.

१४ फेब्रुवारी १९७० ला नवा वटहुकूम काढण्यात आला. ३१ मार्च १९७० ला त्याचे कायद्यात रुपांतर करण्यात येवून पुर्वलक्षी म्हणजेच १९ जुलै १९६९ पासून लागू करण्यात आला. ही राष्ट्रीयीकरणाची शिफारस हजारी समितीने केली होती.

राष्ट्रीयीकरण झालेल्या १४ बँका :

१. बँक ऑफ इंडिया
२) युनियन बँक ऑफ इंडिया
३)बँक ऑफ बडोदा
४)बँक ऑफ महाराष्ट्र
५)पंजाब नॅशनल बँक
६)इंडियन बँक
७)इंडियन ओवरसिज बँक
८)सेंट्रल बँक ऑफ इंडिया
९) कॅनरा बँक
१०)सिंडिकेट बँक
११) युनायटेड कमर्शिअल बँक
१२)अलाहाबाद बँक
१३)युनायटेड बँक ऑफ इंडिया
१४)देना बँक.

या बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर एकूण ८७ कोटी रु. नुकसान भरपाई देण्यात आली. सर्वात जास्त नुकसान भरपाई सेंट्रल बँक ऑफ इंडिया (१७ .५ कोटी) तर सर्वात कमी नुकसान भरपाई बँक ऑफ महाराष्ट्र व इंडियन बँक यांना प्रत्येकी २.३ कोटी रुपये देण्यात आले.

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 10:23 ( 3 years ago) 5 Answer 8042 +22