Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण आहेत?
आधुनिक मराठी कादंबरीचे जनक नामवंत मराठी साहित्यिक ह. ना. आपटे आहेत.
मराठी साहित्यातील ‘कादंबरी’ या प्रकारात अनेक साहित्यिकांनी आपला विशेष असा ठसा उमटवला. सर्व प्रथम बाबा पद्मजी यांनी ‘यमुना पर्यटन’ ही मराठी कादंबरी लिहून ‘कादंबरी’ हा साहित्यप्रकार सर्वश्रुत केला. पण मराठी कादंबरीला सर्वप्रथम आधुनिक स्वरूप देणारे प्रतिभावंत कादंबरीकार म्हणजे हरी नारायण आपटे. ते हरिभाऊ आपटे या नावानेही प्रसिद्ध होते. दि. ८ मार्च, १८६४ रोजी जळगाव जिल्ह्यातील पारोळे या एका लहान खेडेगावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई येथील गिरगावमधील जगन्नाथ शंकरशेठ यांच्या शाळेत व गिरगाव बँक रोडवरील बिशप हायस्कूल येथे इंग्रजी तिसरीपर्यंत झाले. सन १८७८ मध्ये आपटे कुटुंबीय विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत आले व तेथील शेवडे बोळातील जानवेकर यांच्या वाड्यात कायमचे वास्तव्य केले. पुणे येथील सरकारी पुना हायस्कूल या शाळेत आपटे यांनी प्रवेश घेतला. त्यावेळेस त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकर, जीन्सिवले व म. मो. कुंटे यांसारखे गुरुवर्य लाभले. सन १८८० मध्ये लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, वामन शिवराम आपटे, ह. कृ. दामले या त्याकाळच्या नामवंत मंडळींनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल या मराठी शाळेची स्थापना केली. त्यामुळे या सर्वांच्या प्रेरणेमुळे आपटे यांनी पुना सरकारी हायस्कूल सोडून नव्याने स्थापन झालेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी सहावीत प्रवेश घेतला. त्यामुळे शाळेच्या सुरुवातीच्या वेळी जे ११ उपस्थित होते, त्या विद्यार्थ्यांपैकी आपटेही एक होते. या शाळेने त्यांना इंग्रजी व संस्कृत वाङ्मयाचे जे लेणे दिले, त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागली. सन १८८२ मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने सर्वांप्रमाणेच आपटे यांना धक्का बसला व यातून त्यांनी अनेक मराठी वृत्तात रचलेले काव्य ‘शिष्याजनविलाप’ हे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. पण प्रसिद्धी पराङ्मुख असलेल्या आपटे यांनी त्या पुस्तकावर आपले नाव छापले नव्हते. त्या काळी या पुस्तकाच्या एक हजार प्रती सुमारे दोन दिवसांत संपल्या.