Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
शासनाच्या आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक तथा राज्याचे जन्म-मृत्यू उपमुख्य निबंधकांनी एका अधिसुचनेद्वारे ज्या नागरिकांच्या जन्माच्या नोंदणीला 15 वर्षाचा कालावधी पुर्ण झाला. परंतु नाव नाेंदविले गेले नाही. अशा सर्व नागरिकांना जन्म नोंदणीत नाव समाविष्ट करण्याची संधी मिळणार आहे. किंबहुना नोंदणी केलेल्या व्यक्ती अथवा त्यांच्या पालकांना जन्माची नोंद करता येणार आहे. ही मुदत केवळ 27 एप्रिल 2026 पर्यंतच उपलब्ध असेल. त्यानंतर हा कालावधी कुठल्याही परिस्थितीत वाढवून दिला जाणार नाही असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जन्म दाखल्यात नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांनी नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र (दहावी, बारावी) , पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी 2 पुराव्यासह जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.
जन्म नोंदीपासून वंचित नागरिकांना नेहमीच सहकार्य केले जाते. तरीही जन्म नोंदीत नाव समाविष्ट करण्यासाठीची मुदत 14 मे 2020 पर्यंत हाेती. ती आता 27 एप्रिल 2026 पर्यंत झाली आहे.
याबराेबरच जन्म व मृत्यू विभागात याेग्य कागदपत्र, प्रमाणपत्राच्या माध्यमातून जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 चे कलम व महाराष्ट्र जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम 2000 नियम 10 नुसार न्यायालयीन प्रक्रियेद्वारे जन्म नाेंदणी देखील मिळवता येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.