नागपूर शहराचे नाव नागपूर कसे पडले?www.marathimahiti.com

नागपूर शहराचे नाव नागपूर कसे पडले?

नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. हा ताम्रपट देवळी (वर्धा) येथे मिळाला असून तो इ.स. ९४०चा आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. देवगड राज्यात त्या काळी नागपूर, सिवनी, बालाघाट, बैतूल आणि होशंगाबाद यांचा समावेश होत असे. बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपुरास हलवली. त्याने जवळजवळ ३३ वर्षे राज्य करून नागपूर शहर भरभराटीस आणले.राजा चांद सुलतान याच्या मॄत्यूनंतर नागपूरवर भोसल्यांचे राज्य आले.इ.स. १७४२ मधे रघूजीराजे भोसले नागपूरच्या गादीवर आरूढ झाले. इ.स. १८१७ मध्ये सीताबर्डीच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी नागपूरचा ताबा घेतला. इ.स. १८६१ मध्ये नागपूर ही सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी झाली.

इ.स. १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली. टाटा समूहाने देशातील पहिला कापड उद्योग याच शहरात सुरू केला.त्याच एम्प्रेस व मॉडेल मिल होत. भारतीय स्वातंत्र्य युद्धातदेखील शहराने महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात कॉॅंग्रेसची दोन अधिवेशने नागपुरात झाली व असहकार आंदोलन नागपूरच्या १९२० च्या अधिवेशनापासून सुरू झाले.१९२५ सालि डॉ.केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी नागपूर इथे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ [आरएसएस] 'ची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार भारताच्या एक प्रांत बनला. १९५० साली मध्य प्रदेश राज्याची निर्मिती झाली व वऱ्हाड (विदर्भ)नव्या राज्यात आला. नागपूरला भारताची राजधानी करण्याचाही प्रस्ताव होता. आज, नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.

१९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये येऊन आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.


भूगोल व हवामान

नागपूर शहरामधून नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी जाते. पैकी नाग नदी ही शहराच्या संस्कृतीशी जोडलेली आहे. ही नदी शहरातून एकूण १७ किलोमीटरचा प्रवास करते. सर्व नद्यांची एकूण लांबी ४८ किमी. आहे.

नागपूर शहर ज्या नदीवर वसले आहे त्या नाग नदीचे अनेक वर्षांच्या अनास्थेमुळे नाल्यात रूपांतर झाले होते. पिवळी नदी आणि पोरा नदीचीही हीच परिस्थिती होती. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनासंबंधित लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शहरातील नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवन प्रकल्पांचे काम हाती घेऊन ते २०२० सालच्या पावसाळ्याआधीच पूर्ण केले. त्यानंतर या नद्या पूर्वीप्रमाणेच मुक्तपणे वाहू लागल्या असाव्यात.

नागपूरचे क्षेत्रफळ २२० चौरस किलोमीटर असून समुद्रसपाटीपासूनची उंची ३१० मी (१०२० फूट)आहे. समुद्रापासून दूर असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त शहराचे हवामान शुष्क व थोडे उष्ण असते. शहरातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२०५ मिलिमीटर इतके आहे. पाऊस जून-सप्टेंबर महिन्यांदरम्यान पडतो. मार्च ते जून उन्हाळा असतो व मे महिन्यात पारा सर्वांत वर असतो.उन्हाळ्यात घराबाहेर पडणे अशक्य असते आणि जरी पडले तरी शरीर पूर्ण झाकून बाहेर पडावे लागते. या काळात नागपूरचे उच्चतम तापमान ४५° सेल्सियसपर्यंत वर जाते. हिवाळा नोव्हेंबर-जानेवारी महिन्यात असतो व तेव्हा शहराचे न्यूनतम तापमान १०° सेल्सियसच्याही खाली जाते. डिसेंबर २०१८ मध्ये सर्वात कमी म्हणजे ३.५ सेल्सियस होते.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 12:33 ( 3 years ago) 5 Answer 3926 +22