Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
भारतातील साक्षरतेचे सरासरी प्रमाण हे ७७.७ % असून आपल्या देशात केरळ हे राज्य सर्वात अधिक साक्षर आहे. केरळच्या साक्षरतेचे प्रमाण हे 93.91% आहे.
एकूण राज्यांच्या यादीत महाराष्ट्र हा सहाव्या स्थानी आहे. महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण ८४.८ टक्के आहे. पुरुषांच्या आणि महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणात १२.३ टक्क्यांची तफावत आहे. पुरुष ९०.४ टक्के तर महिला या ७८.४ टक्के साक्षर आहेत.
साक्षरतेबाबत देशात पहिली पाच राज्ये
१. केरळ
२. दिल्ली
३. उत्तराखंड
४. हिमाचल प्रदेश
५. आसाम
साक्षरतेत सर्वात मागे असलेली राज्ये
१. आंध्र प्रदेश
२. राजस्थान
३. बिहार
४. तेलंगण
५. उत्तर प्रदेश
तेलंगणा राज्यात साक्षरतेचे प्रमाण हे 72. 8 टक्के आहे. तर आंध्र प्रदेशात हे प्रमाण ६६.४ टक्के आहे. कर्नाटकात साक्षरतेचे प्रमाण ७७.२ आहे. आसामचा विचार करायचा झाल्यास आसाममध्ये साक्षरतेचे प्रमाण हे ८५.९ टक्के आहे. उत्तराखंड ८७.६ टक्क्यांसह देशात तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली हे राज्य देशात दुसऱ्या स्थानावर आहे.
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफीसने शिक्षणासंदर्भात रिपोर्ट जाहीर केला असून या रिपोर्टमधील माहीतीनुसार केरळने आपले प्रथम स्थान अबाधित राखले आहे. इतकेच नव्हे तर केरळमधील महिलांच्या साक्षरतेचे प्रमाणही चांगले आहे. पुरुषांच्या आणि महिलांच्या साक्षरतेमध्ये अवघे 2.2 टक्के अंतर आहे. संपुर्ण देशाचा विचार करायचा झाल्यास भारतात पुरुषांमधील साक्षरता ही महिलांपेक्षा अधिक आहे. पुरुष ८४.७ टक्के तर ७०.३ टक्के महिला साक्षर आहेत. यामध्ये १४.४ टक्के इतके अंतर आहे.