भारताच्या स्वातंत्र्याला किती वर्षे पूर्ण झाली?www.marathimahiti.com

भारताच्या स्वातंत्र्याला आता 75 वर्षे पूर्ण झाली.

अमृत महोत्सव साजरा करण्याची जबाबदारी देशाने आपल्या सगळ्यांवर सोपविली आहे हे आमचे भाग्य आहे. या महोत्सावाबाबत ज्या आशा-अपेक्षा आहेत, ज्या सूचना येत आहेत त्या सर्व आशा-अपेक्षा आणि सूचना पूर्ण करण्यासाठी ही समिती अथक परिश्रम करेल आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना कोणतीही कमतरता ठेवणार नाही. सतत नवीन कल्पना, नवीन सूचना, जनतेला पुन्हा एकदा देशासाठी जगण्यासाठी प्रेरित करणे, या संधीचे कसे सोने करायचे या सगळ्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करत राहाल. आपल्याला आताही काही सन्माननीय सदस्यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. आज एक सुरुवात आहे. आपण पुढे यावर तपशीलवार चर्चा करू. आपल्याकडे अजून 75 आठवडे आणि नंतर संपूर्ण वर्ष आहे. म्हणून जेव्हा आपण या सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ, तेव्हा या सूचना खूप महत्त्वपूर्ण असतात.

आपला अनुभव या सूचनांमधूनही दिसून येतो आणि भारताच्या विविध विचारांसोबत असणारी तुमची कनेक्टिव्हिटी देखील दिसते. इथे आता आमच्या समोर स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या पार्श्वभूमीवर एक सादरीकरण केले गेले. एक प्रकारे विचारांच्या प्रवाहाला वेग देणे हे त्याचे काम आहे. अमुक एका गोष्टीची अंमलबजावणी करायची आहे आणि त्यापुरतेच मर्यादित राहायचे आहे अशी कोणतीही यादी नाही. एक-एक मोघम विचार प्राथमिक आहे कारण कुठूनतरी सुरुवात करण्याची आवश्यकता आहे, हळूहळू जशी यावर चर्चा होईल याला एका कार्यक्रमाचे स्वरूप प्राप्त होईल, वेळ निश्चित केली जाईल, वेळापत्रक तयार केले जाईल. कोण कोणती जबाबदारी पार पाडेल, ती कशी पार पडेल, या सर्व गोष्टींकडे आपण सविस्तरपणे पाहू. आता जे सादरीकरण केले त्यामध्ये देखील मागील काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या मंचांमध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्या गोष्टी समाविष्ट करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचे आयोजन, स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव हा भारतातील प्रत्येक देशातील प्रत्येक व्यक्तीचा, भारतातील प्रत्येकाच्या मनाचा हा उत्सव असावा यासाठी हा प्रयत्न आहे. .

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा हा उत्सव, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन अशाप्रकारे केले पाहिजे की स्वातंत्र्य लढ्याची भावना, त्यामागील त्याग हे सगळे अनुभवता आले पाहिजे. ज्यात देशातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देखील वाहिली जाईल आणि त्यांच्या स्वप्नांमधील भारत घडविण्याचा संकल्पही असावा. ज्यामध्ये सनातन भारतच्या वैभवाची झलक देखील असावी आणि आधुनिक भारताची चमक देखील असावी. ज्यामध्ये अध्यात्माचा प्रकाश देखील असेल आणि आपल्या शास्त्रज्ञांची प्रतिभा आणि सामर्थ्य देखील दिसून येईल. हा कार्यक्रम, 75 वर्षातील आपली कामगिरी संपूर्ण जगासमोर सादर करण्याची आणि पुढील 25 वर्षांसाठी एक आराखडा, एक संकल्प घ्यायची संधी देखील प्रदान करेल. कारण 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याचे शतक साजरे करेल, तेव्हा आपण कुठे असू, जगात आपले स्थान काय असेल, आपण भारताला कुठवर घेऊन जाऊ आणि स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि स्वातंत्र्य लढा आपल्याला प्रेरणा देईल. एक मंचाची स्थापना केली जाईल आणि या मंचाच्या आधारे स्वातंत्र्याची 75 वर्षे भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीसाठी, त्या दिशेने पुढे जाण्यासाठी आमच्यासाठी दिशादर्शक प्रेरणादायक आणि प्रयत्नांची भावना जागृत करणारा असावा.

आपल्या येथे असे म्हटले जाते की-‘उत्सवेन बिना यस्मात् स्थापनम् निष्फलम् भवेत्’ अर्थात कोणताही प्रयत्न, कोणताही संकल्प हा उत्सवा शिवाय यशस्वी होत नाही. जेव्हा एखादा संकल्प उत्सवाचे रूप धारण करतो तेव्हा त्यात लाखो कोटी लोकांचे संकल्प जोडले जातात, लाखो, कोट्यावधी लोकांची ऊर्जा त्यात जोडली जाते. याच भावनेने आपल्याला 130 कोटी देशवासीयांना सोबत घेऊन हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा हा उत्सव साजरा करायचा आहे. लोकसहभाग ही या कार्यक्रमाची मूळ भावना आहे. आणि जेव्हा आपण लोकसहभागाविषयी बोलतो तेव्हा त्यात 130 कोटी देशवासियांची भावना, त्यांची मते आणि सूचना आणि त्यांची स्वप्नेही असतात.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:14 ( 3 years ago) 5 Answer 5402 +22