भारतातील निवडणुका कोण घेते?www.marathimahiti.com

भारतातील निवडणुका कोण घेते?

भारतीय निवडणूक आयोग कार्य स्पष्ट ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे.
भारताची निवडणूक आयोग स्थीर संवैधानिक संस्था आहे. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी संविधानानुसार करण्यात आली.

निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(१९८९ मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.

महत्त्वाची कर्तव्ये :

मतदारसंघ आखणे
मतदारयादी तयार करणे
राजकीय पक्षांना मान्यता देणे निवडणूक चिन्हे ठरवणे
उमेदवारपत्रिका तपासणे
निवडणुका पार पाडणे
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे
आता पर्यतचे निवडनुक आयुक्त

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 11:28 ( 3 years ago) 5 Answer 7706 +22