मम्मटाने काव्याचे किती प्रयोजने सांगितली आहेत?www.marathimahiti.com

भारतीय साहित्यशास्त्रात मम्मटाने १. यश, २. अर्थप्राप्ती, ३. व्यवहारज्ञान, ४. अशुभनिवारण, ५. कान्तासंमित उपदेश, ६. उच्च आनंद ही प्रयोजने सांगितली आहेत.

१. यश- यश याचा अर्थ कीर्ती असून लेखनामुळे लेखकाला कीर्ती मिळते असे हे प्रयोजन मानते. मात्र लेखक कीर्तीसाठी लिहितो असे म्हणणे कठीण आहे असा या प्रयोजनावर आक्षेप आहे.

२. अर्थप्राप्ती- याचा अर्थ पैसा असू लेखक पैशासाठी लिहितो, असे हे प्रयोजन मानते; मात्र केवळ याचसाठी लेखक लिहितो असेही म्हणणे कठीण आहे.

३. व्यवहारज्ञान- याचा अर्थ जीवनाचे भान होय. लेखनामुळे वाचकाला नव्या जाणिवा, अनुभव प्राप्त होतात. ललित साहित्याने हे उद्बोधन होते, त्यासाठी लेखक लिहितो व वाचक वाचतो, असे हे प्रयोजन मानते. मात्र जरी जीवनातील सत्याची जाणीव झाली किंवा जिज्ञासापूर्ती झाली तरी हे काही ललित कृतीचे प्रयोजन नव्हे. तो फार तर त्याचा परिणाम मानता येईल, असे आक्षेपकांचे मत आहे.

४. अशुभनिवारण- याचा अर्थ लेखनामुळे लेखकाचे अशुभ निवारण होणे होय. प्राचीन साहित्यात पदे, आरत्या, क्वचित स्तोत्र यासाठी लिहिली गेली आहेत. देवाची स्तुती केल्याने शंकर रावणावर प्रसन्न झाल्याचे उदाहरण पुराणात आहे. मात्र आधुनिक लेखनाचे हे प्रयोजन मानता येत नाही.

५. कान्तासंमित उपदेश- मम्मटाच्या मते, वेदशास्त्रातील उपदेश प्रभूसंमित असतो, इतिहासपुराणातील उपदेश सुहृतसंमित असतो, तर काव्यातील कांतासंमित- म्हणजे प्रेमळ पत्नीने मधुर शब्दांनी केलेला उपदेश असतो. ‘मनुष्याच्या अंतःकरणाला कोमल स्पर्श करून भावनात्मक आवाहन करणे’ हे कान्तासंमित उपदेशाचे स्वरूप स. रा. गाडगीळांनी सांगितले आहे.१ मात्र हे देखील फलस्वरूपच आहे, कारण लेखक या हेतूने लिहितो असे मानता येत नाही. ६ उच्च आनंद- याचा अर्थ व्यावहारिक आनंदापलीकडील उच्चतर आनंद होय. यालाच आध्यात्मिक आनंद म्हणता येईल. पूर्वी काव्याची प्रेरणाच आध्यात्मिक असल्यामुळे हे प्रयोजन मानल्या जात..

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:14 ( 3 years ago) 5 Answer 5400 +22