Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
भारतीय राज्यघटनेच्या कलम ५८ मध्ये राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असलेली प्रमुख पात्रता निश्चित केली आहे. राष्ट्रपती हा,
1 भारताचा नागरिक
2 ३५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय
3 लोकसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे.
जर एखादी व्यक्ती भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या अंतर्गत लाभाचे कोणतेही पद धारण करत असल्यास किंवा वरीलपैकी कोणत्याही सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणाच्या अधीन असल्यास राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी पात्र राहत नाही.
तथापि, काही पदाधिकाऱ्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उभे राहण्याची परवानगी आहे. त्यामध्ये:
विद्यमान उपराष्ट्रपती
कोणत्याही राज्याचा राज्यपाल
केंद्राचा किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री (पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह)
संसद किंवा राज्य विधीमंडळाचा सदस्य (आमदार किंवा खासदार)
उपराष्ट्रपती, राज्यपाल किंवा मंत्री यांची राष्ट्रपती पदी निवड झाल्यास, त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम सुरू केल्याच्या तारखेपासून त्यांचे पूर्वीचे कार्यालय रिकामे केले असे मानले जाते. संसद किंवा राज्य विधीमंडळाचा सदस्य राष्ट्रपतींच्या पदासाठी निवडणूकीत थांबू शकतो पण जर ते राष्ट्रपती म्हणून निवडून आले तर त्यांनी ज्या तारखेला त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली त्या तारखेला त्यांनी संसद किंवा राज्य विधानमंडळातील त्यांची जागा रिकामी केली असे मानले जाते.जी व्यक्ती, राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत आहे अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती, भारतीय संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असते.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२, अंतर्गत राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवाराला त्यांचे नाव मतपत्रिकेवर दिसण्यासाठी प्रस्तावक म्हणून ५० मतदार आणि समर्थक म्हणून ५० मतदारांची आवश्यकता असते. प्रत्येक उमेदवाराला नामनिर्देशनपत्र सादर करताना पंधरा हजार रुपये रोख इतकी रक्कम जमा करावी लागते.