राष्ट्रीय सेंद्रिय शेती संस्था कुठे आहे?www.marathimahiti.com

राष्ट्रीय सेंद्रिय शेती केंद्र गाजियाबाद/ प्रादेशिक सेंद्रिय शेती केंद्र नागपूर यांचेकडे या प्रादेशिक परिषदेची नोंदणी असावी. नोंदणी असेल तरच त्यांना हा कार्यक्रम राबवता येईल. सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण पीजीएस इंडिया आणि आयसीएस पद्धतीने करण्यात येते.

अन्नधान्याच्या आणि संकरित वाणांच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटक नाशके, बुरशी नाशके आणि तण नाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतूलन बिघडून जमिनीतील जैविक घटकांचा विनाश झाल्याने जमिनी मृतवत होत चालल्या आहेत. त्यामुळे मानव व पशुपक्षी यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. यामुळे कँन्सर सारखे दुर्धर आजार मानवास मोठ्या प्रमाणात जडत आहेत. तसेच रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी कडक होत आहेत. त्यामुळे मशागतीच्या खर्चात वाढ होत आहे. तसेच रासायनिक निविष्ठांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परिणामी उत्पादन खर्च वाढून शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. यास पर्याय म्हणून विषमुक्त सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे आणि शेतीमध्ये रसायनांचा वापर पूर्णपणे थांबवणे हि नितांत गरज आहे. 

जैविक पद्धतीने उत्पादित शेतमालाचे सेंद्रिय प्रमाणीकरण, प्राथमिक प्रक्रिया, बाजारपेठ शृंखला, समूह गट स्थापन करून त्या माध्यमातून शेती उत्पादनांना बाजारपेठेसोबतच योग्य भाव मिळू शकेल. यातून शेतकरी यांचा उत्पादन खर्च कमी होऊन निव्वळ नफ्यात वाढ होऊ शकेल.  

यासाठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत पॅरापंरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती ) हि योजना केंद्र हिंसा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के या प्रमाणे राबविणेत येत आहे. 

solved 5
कृषि Monday 5th Dec 2022 : 16:05 ( 3 years ago) 5 Answer 4419 +22