ललितेतर साहित्याचे स्वरूप कसे असते?www.marathimahiti.com

ललितेतर साहित्याचे स्वरूप कसे असते?

ललितेतर साहित्य : ललितेतर वाङ्‌मयाचे मुख्य उद्दिष्ट वाचकाला माहिती व ज्ञान देणे, अशा स्वरूपाचे असते. त्यात प्रत्यक्ष वास्तवाला, त्यातील तथ्यालाच केवळ प्राधान्य असते. लेखकाच्या कल्पनाविलासाला त्यात अजिबात वाव नसतो. शब्द हेच माध्यम स्वीकारून विविध ज्ञानशाखांमधील ललितेतर वाङ्‌मय निर्माण होत असते.

ललित साहित्य हा शब्द विद्यमान मराठी साहित्यव्यवहारात जास्त रूळला आहे. ‘सहित’ ह्या विशेषणापासून साहित्य हे भाववाचक नाम बनलेले आहे. एकत्र असणे, बरोबर असणे, असा त्याचा शब्दशः अर्थ. शब्द आणि अर्थ यांचे एकत्र अस्तित्व ‘साहित्य’ या शब्दामध्ये मानले गेले आहे. राजशेखराने ‘पंचमी साहित्य विद्या’ असे म्हणून साहित्यचर्चेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. साहित्याच्या अभिप्रेत स्वरूपात शब्द आणि अर्थ हे एकमेकांत मिसळून गेलेले असतात किंवा एकजीव झालेले असतात. त्यांचे अभिन्नत्व वा एकजीवित्व हे साहित्याचे प्रधान लक्षण मानले जाते. ए. सी. ब्रॅडली या इंग्रज टीकाकारानेही ‘व्हेअर साउंड अँड मीनिंग आर वन’ अशी साहित्याची व्याख्या करून, हे शब्द व अर्थाचे एकजीवित्व अधोरेखित केले आहे. शब्द म्हणजे ध्वनी वा अक्षरसमूह किंवा वर्णसमूह असा विस्तार होऊन, अशा अनेक शब्दसमूहांचे बनणारे वाक्य व वाक्यसमूहांतून व्यक्त होणारा आशय असा व्यापक अर्थ शब्द या संज्ञेत सामावलेला आहे. संवेदनांची, विचारांची, कल्पनांची संघटना असाही अर्थ ही संज्ञा वापरताना अभिप्रेत असतो. तद्वतच अर्थ या संज्ञेमध्ये चातुर्य, रमणीयत्व, सहेतुकत्व अशा अनेक छटा सामावलेल्या आहेत. अशा व्यापक अर्थाने शब्द व अर्थ यांचे सहअस्तित्व व एकजीवित्व हे साहित्याचे मुख्य लक्षण ठरते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:06 ( 3 years ago) 5 Answer 5380 +22