Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
वंदे मातरम् (अर्थ: आई, मी तुला नमन करतो) ही १८७० मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी उच्च संस्कृतमय बंगाली भाषेत लिहिलेली एक कविता आहे. त्यांनी ही कविता त्यांच्या १८८२ च्या आनंदमठ या बंगाली कादंबरीत समाविष्ट केली होती. ही कविता सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायली होती. ऑगस्ट १९४७ मध्ये ब्रिटिश राजवट संपण्यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीने ऑक्टोबर १९३७ मध्ये या गाण्याचे पहिले दोन श्लोक भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते.
वंदे मातरम या शीर्षकाचा अर्थ "मातृभूमी मातेची मी स्तुती करतो" असा आहे. [गाण्याच्या नंतरच्या श्लोकांमधील "माता देवी" चे वर्णन लोकांची मातृभूमी असे केले आहे – बंगमाता आणि भारत माता परंतु मजकुरात याचा स्पष्ट उल्लेख नाही.
१८९६ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम राजकीय संदर्भात गायलेल्या या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. १९०५ पासून भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये हे लोकप्रिय मार्चिंग गाणे बनले. अध्यात्मिक भारतीय राष्ट्रवादी आणि तत्वज्ञानी श्री अरबिंदो यांनी या गीताचा उल्लेख " बंगालचे राष्ट्रगीत" म्हणून केला. [१७] या गाण्यावर आणि कादंबरीवर वसाहतवादी सरकारने बंदी घातली होती, परंतु कामगार आणि सामान्य जनता यांनी ही बंदी झुगारून दिली होती ( अनेकांना सार्वजनिक ठिकाणी हे गीत गाण्यासाठी वारंवार तुरुंगात टाकण्यात आले होते); १९४७ मध्ये देशाला वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने या गीतावरची बंदी हटवली.
२४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने "वंदे मातरम" हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले. याप्रसंगी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणाले की, " जन गण मन " या भारताच्या राष्ट्रगीताच्या बरोबरीने या गाण्याचा देखील सन्मान केला पाहिजे." तथापि, भारतीय राज्यघटनेत "राष्ट्रीय गीता"चा उल्लेख नाही.
या गाण्याचे पहिले दोन श्लोक हे आई आणि मातृभूमीचा अमूर्त संदर्भ आहेत, ते कोणत्याही हिंदू देवतेचा नावाने उल्लेख करत नाहीत. परंतु नंतरच्या श्लोकांमध्ये दुर्गासारख्या देवींचा उल्लेख आहे. या गाण्याच्या सादरीकरणासाठी परिस्थितीनुसार ६५ सेकंद अवधीचा तपशील आहे; परंतु "जन गण मन" या राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद हा कालावधी निश्चित आहे.