Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
शिवकालीन राजगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय?
राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव. हा किल्ला बहामनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते.
राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती.
राजगड किल्ला हे पुणे शहरापासून दक्षिण-पश्चिमेस स्थित आहे. गुंजावणे हे मूळ गाव पुण्यापासून सुमारे 60 किमी अंतरावर आहे.
राजगड किल्ल्याचा इतिहास मराठी :
राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमीपुत्र सातकर्णी याने दिले.
1645 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले.
मराठेशाहीची 25 वर्षे राजधानी याव्यतिरिक्त किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनाचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म व सईबाईंचे यांचे निधन या महत्त्वाच्या घटना राजगड किल्ल्यावर घडल्या आहेत.
राजगड हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.
नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगड वर नेली.
राजगडाची वैशिष्ट्ये :
राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला.-