Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
संयुक्त भांडवली संस्था - कंपनीच्या एकूण भांडवल एक विशिष्ट भाग त्याच्या सदस्य ऐच्छिक सहभाग आधारावर तयार औद्योगिक संस्था एक मूलतः नवीन फॉर्म आहे. अशा आर्थिक संबंध निर्माण परिवर्तन आणि खाजगी उद्योजक विकास प्रक्रियेत प्राप्त नैसर्गिक परिणाम होता.
संयुक्त भांडवली संस्था हा व्यवसाय संघटनेचा एक उत्कृष्ट प्रकार आहे की जो आधुनिक उद्योग व व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये झालेल्या औदयोगिक क्रांतीमुळे या ð व्यवसाय संघटने चा उदय झाला. मुख्यत: कारखानदारी पद्धतीत प्रचंड प्रमाणात भांडवल व व्यवस्थापनकौशल्य पुरविण्यास व्यक्तिगत व्यापारी तसेच भागीदारी संस्था असमर्थ ठरल्यामुळे संयुक्त भांडवल कंपन्यांची निर्मिती करण्यात आली. अल्पावधीत प्रचंड भांडवल व व्यवस्थापनकौशल्य पुरविण्यास ही संघटना यशस्वी ठरल्यामुळे, तिचा इंग्लंड आणि यूरोपात प्रसार झाला. अशा प्रकारच्या संघटनेची सुरूवात प्रथम इटलीमध्ये तेराव्या शतकात झाली. इंग्लंडमध्ये १८४४ साली संयुक्त भांडवल कंपनी (प्रमंडळ) कायदा अस्तित्वात आला. भारतात १९१३ साली पहिला स्वतंत्र कंपनी कायदा अंमलात आला व त्यानंतर १९५६ मध्ये विदयमान रूढ असलेला भारतीय कंपन्यांचा कायदा संमत करण्यात आला.
संयुक्त भांडवल कंपनीची नोंदणी सक्तीची असून, ती कायदयाने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे तिला स्वत:चे असे बोध- चिन्ह असते. सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांवर व करारांवर कंपनीचे बोधचिन्ह छापलेले असते. कंपनीच्या सभासदांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांपुरतीच मर्यादित असते. कंपनीचे भागधारक आपल्या भागांचे हस्तांतर कितीही वेळा करू शकतात. कंपनीच्या भागधारकांची संख्या मोठी असल्यामुळे व ते सर्व विखुरलेले असल्यामुळे, कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनात सहभागी होऊ शकत नाहीत. त्यासाठी ते आपले प्रतिनिधी म्हणजेच संचालक निवडतात व अशा संचालक मंडळामार्फत कंपनीचा कारभार चालतो. कंपनी भागांची व कर्जरोख्यांची विकी करून मोठया प्रमाणावर भांडवल उभारणी करू शकते.