समूह शेती म्हणजे काय?www.marathimahiti.com

एका समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रात सामूहिक शेती करणे, शेती उत्पादनावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे, एकत्रित विपणनासाठी सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करणे, या सर्व माध्यमांतून गट समूहाचा विकास घडवून आणणे म्हणजे गट अथवा समूह शेती.

गट शेती म्हणजे काय?

गट शेती म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन स्वतः न कसता अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येणे आणि एकत्र आल्या नंतर शेती शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रामध्ये सामूहिक रित्या शेती करणे म्हणजे यालाच गट शेती असे म्हटले जाते.
तसेच गट शेती म्हणजे शेती संबंधित इतर उत्पादनावर प्रक्रिया करणे तसेच मूल्यवर्धन करणे हे सुध्दा.

समूह शेती मध्ये सर्व शेतकरी एकत्र येऊन विपणन करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करतात, आणि या सर्व बाबींच्या माध्यमांतून आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा म्हणजेच गट समूहाचा विकास साध्य करून सर्व शेतकऱ्यांची समूहाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करणे म्हणजे गटशेती होय. 

आपल्या देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनातर्फे अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे, तसेच गट शेती च्या माध्यमातून सामूहिक रित्या शेती करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल यासाठी गट शेती ला प्रोत्साहन हे देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष शासनाने वर्ष २०२२ पर्यंत करण्याचे ठरविले आहे आणि त्याच साठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. आणि याच अनुषंगाने शासन तर्फे पथदर्शी योजना ही आखण्यात आलेली आहेत.

योजनेची अंमलबजावणी कश्या प्रकारे करावी:-

महाराष्ट्र राज्यात गट शेती योजना अंतर्गत शेती करण्यासाठी ज्यांना गट शेती करायची आहे त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणी करावी व गट स्थापन करण्यात यावा. अथवा कंपनी कायदा 1956 च्या तरतुदी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून शेतकरी गटाची नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.
गट शेती योजना अनुदान:-

मित्रानो वरील सर्व गोष्टी पूर्ण करून तुम्ही गट नोंदणी केल्या नंतर या गट शेती योजना अंतर्गत गटा साठी दोन वर्षांत या गटास जास्तीत जास्त एक कोटी रुपयांचे अनुदान हे शासनातर्फे देण्यात येणार आहेत.

आणि या गट शेती योजना चा लाभ देण्यासाठी 200 इतक्या नोंदणीकृत शेतकरी गटांना समूहांना या गट शेती योजना चां लाभ देण्यासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. 

या गट शेती योजना च्या माध्यमातून तुमच्या भागातील शेती पद्धती व शेतीचा प्रकल्प हा विचारात घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर गटशेती कशी करायची या साठी गट शेती करण्याचे एक मॉडेल हे तयार करण्यात येईल.

या गट शेती च्या माध्यमातून शेतकरी समूहाला शेती व्यवसाय सोबतच शेती पूरक व्यवसाय तसेच विपणन या सर्व बाबींचे महत्व समजावे तसेच शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा या उद्देशाने पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग व रेशीम उद्योग आदी विभागांच्या देखील आदर्श नमुना प्रकल्पाचा सुद्धा समावेश ह्या गट शेती योजना च्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

तसेच या गट शेती योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना सर्वच शेती संबंधित जसे, शेती चे काम करण्यासाठी लागणारी विविध प्रकारची अवजारे, यंत्रे इत्यादी चा समावेश हा करण्यात येणार आहे.

जर या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी संख्या १०० एकराच्या पटीमध्ये जर वाढवली तर शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान देखील शासनातर्फे वाढविण्यात येणार आहेत. जर वरील प्रमाणे शेतकऱ्यांची संख्या वाढविली तर प्रत्येकी 100 एकरांसाठी १ कोटी रुपये इतक्या रुपयाचे अनुदान वाढ करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची संख्या वाढविणे इतकेच जमीन चे म्हणजेच एकराचे प्रमाण देखील वाढवणे महत्वाचे असणार आहे.

 या योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थ्यांनी घ्यावा तसेच शेतकरी गटांनी चांगली कामगिरी करून या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन स्वतःचा विकास साधावा या साठी जे शेतकरी उत्कृष्ट कामगिरी करतील अशा शेतकरी गटांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या मध्ये प्रथम येणाऱ्या शेतकरी गटास २५ लाख रुपये अनुदान तर द्वितीय येणाऱ्या गटास १५ लाख रुपये अनुदान तसेच जो गट तृतीय येईल त्या गटास ५ लाख रुपये इतके पारितोषिक हे शासनातर्फे देण्यात येणार आहेत.

समूह किंवा गट शेतीची आवश्यकता का असणार आहे?

आपल्या देशातील शेतकऱ्यांकडे कमी प्रमाण शेत जमीन आहे, आपल्या देशामध्ये अल्पभूधारक शेतकरी यांचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. त्या मुळे एकटा शेतकरी हा पाहिजे तसा शेती व्यवसाय करू शकत नाही. त्याला स्वताच्या कमी जमिनीसाठी जास्त खर्च करावा लागतो. त्यामुळे लागत खर्च वाढल्या मुळे शेतकऱ्यांना जेवढे उत्पन्न होईल त्या मध्ये त्यांच्या खर्च वजा केल्या नंतर मिळणारा फायदा कमी प्रमाणात होतो. 

याच कारणामुळे समूह किंवा गट शेती करून शेती ही सामुहिकरीत्या करून विकास साधता यावा म्हणून गट शेती हा पर्याय आहे.

समूह शेतीचे फायदे काय आहेत:-

गट शेती मध्ये शेती ही सामुहिकरीत्या करण्यात येत असल्यामुळे गट शेती करताना उच्च तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब हा करण्यात येतो. त्यामुळे शेती खर्च कमी होऊन शेती व्यवसाय फायदेशीर होण्यास मदत होईल. तसेच गट शेती मध्ये सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा शेत माल सामूहिकरीत्या विकल्यामुळे शेत मालावर येणारा खर्च उत्पादन तसेच वाहतूक खर्च कमी होतो. त्यामुळे मुळे शेतकरी बांधवांना फायदा होतो.

गट शेती मध्ये सर्व शेतकरी एकत्र पणे शेती करत असल्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रामणावर भांडवल असते. तसेच खर्च कमी येतो आणि उत्पादन ही जास्त प्रमाणात होणार असल्याने शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे शक्य होणार आहे.

सामूहिक रित्या शेती करत असल्यामुळे पशुपालन , मत्स्यपालन, दूध व्यवसाय, मधुमक्षिका पालन, तसेच रेशीम उद्योग आणि रोपवाटिका हे शेती पूरक व्यवसाय आहेत, या शेती पूरक व्यवसाय हे करणे शक्य होतील त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. दिवसेंदिवस आपल्या कडे असणाऱ्या जमिनी ह्या कमी होत आहे. त्यामुळे कमी जमीन असल्यामुळे प्रतेक शेतकरी स्वतः शेती करून आपला पाहिजे तसा विकास करू शकणार नाही, त्यामुळे गट शेती हा पर्याय शेतकरी बांधवांना फायदा मिळवून देऊ शकतो. कारण या गट शेती मुळे शेतकरी शेती व्यवसाय बरोबरच शेती पूरक व्यवसाय सुद्धा करतील. तसेच गट शेती मुळे शेतकरी गटास विविध शेती संबंधित खर्च साठी बँकेकडून कर्ज मिळते, वेळेत कर्ज परत केल्यास व्याज दरात सवलत देण्यात येते. तसेच नाबार्ड मार्फत शेतकरी गट योजना विविध प्रकारे आर्थिक मदत सुद्धा मिळत असते.

solved 5
कृषि Monday 5th Dec 2022 : 14:27 ( 3 years ago) 5 Answer 4145 +22